Who is Bharat Mata - Kon Aahe Bharat Mata (Marathi) | Zipri.in
                      Who is Bharat Mata - Kon Aahe Bharat Mata (Marathi)

Who is Bharat Mata - Kon Aahe Bharat Mata (Marathi)

Quick Overview

Rs. on ShopcluesBuy
Product Price Comparison

ज्या घोषणेत तुम्ही भारतमातेच्या विजयाची इच्छा बाळगता ती हि भारतमाता कोण आहे? 'असा प्रश्न १९३६मध्ये एका सार्वजनिक सभेत जवाहरलाल नेहेरूंनी विचारलं होत. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे आघाडीचे नेते आणि पुढे देशाचे पहिले प्रांतप्रधान झालेले हे,तेच जवाहरलाल होते. त्यांनी भाषणात नंतर असे जाहीर केले होते कि, भारतातील पर्वत आणि नद्या, जंगले आणि आफत शेते या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रिय होत्याच,
पण तरीही अखेरीस या विशाल भूमीत सर्वत्र पसरलेले भारतीय लोकच जास्त महत्वाचे होते....भारतमाता म्हणजे कोट्यवधी लोकच असेल पाहिजेत. आणि भारतमातेचा विजय याचा अर्थ या लोकांचा विषय असाच असला पाहिजे. 'हे पुस्तक आपल्याला या लोकशाहीवादी आणि सर्वसमावेशक द्रीष्टीकोनामागे असेल्या प्रामाणिक मनाचे,त्याच्या विहाराचे दर्शन घडवते. सध्याच्या ज्या काळात भारताच्या कोट्यवधी रहिवाश्यांना आणि नागरिकांना वगळणाऱ्या भारतासाच्या जहाल कल्पनांची उभारणी करण्यासाठी 'राष्ट्रवादाचा' आणि 'भरात माता कि जय' या घोषणेचा वापर केला जात आहे, विशेषतः या काळात हे पुस्तक सुंसंगात, समयोचित ठरते.
कोण आहे भारत माता? (हू इस भारत माता ?) या पुस्तकात नेहेरुंचा अभिजात पुटकांतील निवडक लोकांच समावेश आहे. अँड ऑटोबायोग्राफी,ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री आणि द डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. याखेरीज त्यांची भाषणे, निबंध आणि पत्रे आणि त्यांच्या काही अतिशय स्पष्ट मुलाखतीही यात अंतर्भूत आहेत. या संकलनाच्या दुसऱ्या भागात महात्मा गांधी, भगतसिंग,सरदार पटेल, मौलाना आझाद,, अरुण असफ अली,शेख अब्दुल्ला, रंधरी सिंग 'दिनकर', अली सरदार जाफ्री, बलदेव सिंग ,मार्टिन ल्यूथन किंग जुनियर, रिचर्ड आयातटांबरो, ली कुआन यु, अटळ बिहारी वाजपेयी आणि इतर काही जणांनी केलेले नेहेरुंचे मूल्यमापन आहे. विविध लोकांनी लिहिलेल्या लेखांच्या या व्यापक संग्रहातून आणि त्याला लाभलेल्या माहितीपूर्ण प्रस्तावनेतून, कल्पनांनी आणि कार्याने अंत्यत आगळ्यावेगळ्या, लक्षणीय व्यक्तिमहत्वाच्या स्वरूपात पंडित नेहरूंचे दर्शन आपल्याला घडते. भारताच्या संस्कृत जगतासाच्या चैतन्याचे उत्स्फ्रूर्त आकलन असलेला वैज्ञानिक प्रवृत्तीशी सुस्पष्ट बांधिलकी असलेला, राजकारणात काही गोष्टी करणे भागच असले तरीही लोकशाहीवादीच राहिलेला नेता म्हणून नेहेरुंचे दर्शन आपल्याला घडते. त्यांचा वारसा अत्यंत महत्वाचा आहे कदाचित आपल्या इतिहासातील इतर कुठल्याही काळापेक्षा तो आज जास्तच महत्वही आहे.